जलतारा योजना

जलतारा योजना
नमस्कार शेतकरी बंधुनो !
चला तर आज शासनाच्या एका नवीन योजनेबाबत जाणून घेऊया.
जलतारा योजना ………

योजनेमध्ये काय आहे?
शेतामध्ये पाण्याचा साठा वाढविण्याची उपाययोजना

ते कसे?
शेतामध्ये जिथे उतार आहे तसेच जिथे पानबसन जागा आहे तिथे ५ फूट लांब ,५ फूट रुंद व ६ फूट खोल ( १.५ मी लांब *१. ५ मी रुंद *१. ८ मी. खोल )खड्डा करायचा . नंतर तो खड्डा मोठ्या दगडाने भरायचा . शक्यतो ८० mm ते १०० mm आकाराचे दगड वापरावे.


शासनामार्फत काही अनुदान आहे का ?
हो , हि योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( MAGNAREGA ) मार्फत राबवली जाते. त्यामुळे एका खड्ड्याला ४६४३ रुपये अनुदान आहे.

एका शेतात आपण किती खड्डे करू शकतो ?
एका एकराला एक याप्रमाणे आवश्यक तेवढे जलतारा खड्डे करू शकतो.

या योजनेमुळे काय फायदा होऊ शकतात ?
१. या योजनेमुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते व वीराचे पाणी जास्त काळ टिकून राहते.
२. शेतात एकाच वेळेस जास्त पाऊस झाल्यास जास्त काळ पाणी साचून राहत नाही.
३. पिकाची उत्पादकता वाढविण्यास मदत होते.
४. तसेच जमीन चिबड होण्यापासून वाचवते.

मग योजनेचा लाभ कसा घायचा ?
कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यकाच्या मदतीने अर्ज करून.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे?
१. MGNAGERA च जॉबकार्ड
२. चालू वर्षाचा ७/१२ व ८ अ
३. शेताचा नकाशा
४. आधार कार्ड
५. बँकेचे खाते
६. ग्रामपंचायतीचा ठराव.

Leave a Comment